मुंबई – राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. त्यातच राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर 28 मार्चनंतर वातावरणात बदल पाहायला मिळतील. सध्या सर्वाधिक तापमान असणाऱ्या विदर्भात 28 मार्चनंतर पावसाची शक्यता आहे.
सध्या विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा 40 च्या पुढे गेला आहे. मात्र 28 मार्चनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
त्यात प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भासह, मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव शहरात होते. मालेगावात 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मालेगावसह अकोला, यवतमाळ, सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान चाळीशीपार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांच्या पुढे आहे
तापमानात का होत आहे वाढ?
कर्नाटक ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरातवरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रतेसोबत गरम हवा घेऊन येत आहे.
अजून एक पश्चिमी विक्षोभ 29 मार्चपर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात 28, 29 आणि 30 मार्च दरम्यान आद्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.