नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलनात वाहनाने काही शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
प्रियंका गांधी गेल्या कित्येक तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. याच दरम्यान आता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?” असा संतप्त सवाल करत प्रियंका यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या 28 तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?” अशी विचारणा प्रियंका यांनी ट्विटमधून केली आहे.
यावेळी त्यांनी त्यादिवशी झालेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत” असं राहुल यांनी म्हटले आहे.