भोर – जर राजकारण म्हणून भोरची औद्योगिक वसाहत आणि भोरच्या विकासावर राजकारण करता मग पुण्याचे पालकमंञी म्हणून आपण १५ वर्षात काय दिवे लावले ते अगोदर सांगा, अशी बोचरी टीका आमदार संग्राम थोपटे यांनी केली. लोकसभेच्या शरद पवार गटाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भोर शहरातील कोपरा सभेत बोलताना उपमुख्यमंञी अजित पवार यांच्यावर नाव न घेता थोपटे यांनी टीका केली.
भोर,शहरातील विविध ठिकाणी कोपरा सभा आयोजित केल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे,माजी नगराध्यक्ष विठठल शिदे,सतिष चव्हाण माजी नगराध्यक्ष सचिन हर्णसकर,निर्मला आवारे,समिर सागळे,अमित सागळे,बजरंग शिंदे,देवीदास गायकवाड,प्रदीप बहिरट,शांताराम पवार तृप्ती किरवे,गणेश मोहिते,गणेश पवार,जगदीश किरवे,
गितांजली आंबवले जयश्री शिदे,गितांजली शेटे,वृषाली घोरपडे,हसिना शेख,बिंदु साडेकर, नितिन धारणे,सादिक फरास,जगदीश गुजराथी,रामचंद्र आवारे,तोसिफ,आतार,पार्थ रावळ,अँड विश्वनाथ रोमण आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे पुढे म्हणाले, भाटघर नीरादेवघर धरणातून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली शेतीसाठी आर्वतन सोडले जाते. विरोध केला तर राजकारण केले जाते. भोरमधील १९९२ सालापासून औद्योगिक वसाहत मंजूर आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जमीन द्यावी, हाच विषय होता.