कटक – भारतासाठी विश्वचषक जिंकणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. देशासाठी चांगली कामगिरी करणेदेखील माझ्यासाठी महत्वाचे आहे. मी त्यासाठी सतत उत्सुक आहे. देशासाठी खेळण्याची भावना नेहमीच माझ्यासाठी खास राहिली आहे, असे हार्दिक पंड्याने म्हटले आहे.
तुम्ही खेळत असलेला प्रत्येक सामना तुमच्या शेवटच्या सामन्याइतकाच महत्त्वाचा असतो. विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य ध्येय आहे. सध्या त्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या मालिका महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा क्रिकेट पूर्ण जोमात सुरू झाले आहे. त्यामुळे सतत फॉर्ममध्ये राहणे गरजेचे आहे. कदाचित भविष्यात माझ्या भूमिका आणि जबाबदाऱ्याही बदलल्या जातील, असेही त्याने सांगितले.