नागपूर – पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडगार झालेल्या वातावरणात उद्या गुरूवारपासून (ता.७) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ व सर्वपक्षीय आमदार सलग २ आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहेत. यामुळे नागपूरचा राजकीय पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. (hiwali adhiweshan)
पावसाळी वातावरणात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा व धनगर ( Maratha dhangar reservation ) समाजाचे आरक्षणाकडे लक्ष आहे. ओबीसी समाज ( Obc ) आपल्या कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून दक्ष आहे. आरक्षण द्यायचे आहे, कुणाचे कमी करायचे नाही. मग द्यायचे कसे यावर विचारमंथन करताना सरकारचा कस लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाचे आंदोलन, छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वातील ओबीसी आंदोलन यांचा बाहेरून दबाव राहणार आहे. त्यातच विधिमंडळात आमदारांकडून रेटल्या जाणाऱ्या मागणीचे पडसाद उमटतील. ( Shinde fadanvis sarkar )
३ राज्यांतील सत्तेने भाजपचा उत्साह वाढलेला आहे. तर काँग्रेस नाउमेद झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis ) यांची घरच्या मैदानावरची खेळी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारची हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावर अग्निपरीक्षा होणार आहे.
नागपूर करारानुसार दरवर्षी विधिमंडळाचे १ अधिवेशन विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपुरात घेतले जाते. विदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असली तरी अपवादात्मक काळ सोडला तर हे अधिवेशन २ आठवड्यांपेक्षा अधिक चालत नाही. यंदाही या अधिवेशनात १० दिवसच कामकाज होणार आहे. मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न असल्याने विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.