कोल्हापूर- सांगली- कोल्हापूर बायपास मार्गावर उदगाव अंकली टोल नाक्याजवळ असलेल्या ओढ्यात कंटेनर पडल्याची घटना घडलीय आहे. राजस्थान होऊन सांगलीकडे हा कंटेनर जात होता. कृष्णा नदीच्या काठालगत हा ओढा आहे सध्या या ओढ्यातून रेल्वे ब्रिज च्या खाली कृष्णेचे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. कोल्हापूरहून तमदलगे खिंड मार्गे बायपास मार्गे हा कंटेनर मध्यरात्री जात होता. चालकाला या ओढ्यामध्ये कृष्णेचे पाणी आलेले आहे हे माहीत नसल्याने त्याने सरळ बायपास मार्गावरून कंटेनर घालण्याचा प्रयत्न केला. आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट ओढ्यामध्ये कलंडला.
दरम्यान, कंटेनर चालक व त्याचा साथीदार यामध्ये या घटनेमध्ये वाचले. महेंद्रसिंग असे चालकाचे नाव आहे. या कंटेनरमध्ये काय आहे याची अद्याप माहती मिळालेली नाही. पूर परिस्थितीमुळे जयसिंगपुर पोलीस आणि अंकली टोलनाक्यावर बॅरिकेट्स लावण्यात आहे. मात्र, मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे बॅरिकेट्स उलटे लावल्याने सूचना फलक न दिसल्याने हा अपघात झाल्याचे समजते. जयसिंगपुर पोलीस ठाण्यातील अधिकारी कंटेनर काढण्यासाठी ट्रेन उपलब्ध केले आहे. पाण्याची पातळी जास्त असल्याने तो प्रयत्न अपुरा पडत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली घटनेनंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.