पुणे – पुणे शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून सततच्या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून बहुताश धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी शहरातील मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने शहरातील येरवडा परिसरातील नदीलगतच्या वस्तीत पाणी शिरले आहे. परिणामी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकांना घरातील छताचा आधार घ्यावा लागत आहे. अशातच येरवडा फायर स्टेशनमधील अग्निशमन दलाकडून याठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन सुरू करण्यात आले अाहे. यामध्ये अग्निशमन दलाच्या जवांनानी 7 महिन्यांच्या मुलांसह परेदशी कुटुंबातील 13 जणांना सुखरूप घराबाहेर काढले आहे. अजूनही भागात रेस्क्यू आॅपरेशन सुरू आहे.