हैदराबाद – मागील कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा मोदींच्या काळात देश अधिक कर्जबाजारी झाला आहे आणि त्यांच्या साडेआठ वर्षाच्या कालावधीत देशावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढला असल्याचा आरोप तेलंगणाचे महानगरपालिका प्रशासन मंत्री के. टी. रामाराव यांनी केला आहे.
देशातील इंधनाच्या वाढत्या किमती, वाढता जातीय तणाव या सगळ्याला केंद्रातील भाजप सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
नारायणपेठ शहरातील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आता हे सरकार शेतकऱ्यांवर कर लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते आहे ही एक भयानक कल्पना आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
Karnataka Politics : बोम्मई यांनी आता पॅकअप करावे – कॉंग्रेस
पंतप्रधानांना आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी लिहिलेल्या एका लेखात ही कल्पना मांडण्यात आली आहे, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.