नगर -सणासुदीच्या काळात शहरात लुटीच्या घटना वाढल्या आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या तिघांना अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा 41 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान या लुटीच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघां अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर दत्तात्रय रणखांब (वय- 40 रा. पाइपलाइनरोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री दुचाकीवरील तिघा भामट्यांनी शहरातील तीन ठिकाणी नागरिकांना आडवून लुटले. सुरवातीला सोनी गिफ्ट समोर सुधीर रणखांब यांना अडवून त्यांच्याकडील 6 हजाराची रोकड व 8 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. पुढे हे चोरटे कुष्ठधाम रस्त्या गेले. तेथे रस्त्याने चाललेल्या अर्चना नंदकुमार भालेराव यांना अडवून त्यांच्या जवळील 7 हजाराची रक्कम व 5 हजाराचा मोबाईल काढून घेतला. चोरट्यांनी औरंगाबाद रस्त्यावरील बीटीआर गेट समोर रस्त्याने जाणाऱ्या शितळ संजयकुमार लोळगे यांना गाठून त्यांच्याकडील 7 हजाराची रक्कम व 8 हजाराचा मोबाईल काढून धूम ठोकली.
एकाच वेळी तीन ठिकाणी लुटीच्या घटना घडल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांनी शहरातील ठिकठिकाणी नाकेबंदी केली. परंतू, चोरटे मिळून आले नाही. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक आर. एन. पिंगळे करीत
आहे.