पुणे – भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारचे धोरण म्हणजे हम करे सो कायदा असल्याचे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही महत्वाच्या विषयावर अभ्यास करत नाही. मराठा आरक्षणावरही काही अभ्यास करताना दिसत नाही. महत्वाच्या मुद्यांवर कोणाचे मार्गदशनही घेताना दिसत नाही. त्यामुळे ठाकरे सरकारची हे ‘हम करे सो कायदा’ याच धोरणावर वाटचाल सुरू असल्याची टीका भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपाला झुकते माप देतात का? यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला या विषयावर काही बोलायचे नाही. पण राज्यपाल पदाची एक गरिमा असते ती आपण कायम ठेवली पाहिजे. मात्र या घडीला तसे होताना दिसत नाही. तसचे भगतसिंग कोश्यारी हे भाजपाला झुकते माप देतात अशी चर्चा करणारे सुद्धा ती गरिमा ठेवत नाहीत