आबूधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज होत असलेला सामना वर्चस्वाची लढाई अशा स्वरुपातच खेळला जाणार आहे. बेंगळुरूची बाजू काहीशी वरचढ असली तरीही दिल्लीला प्ले-ऑफमधील स्थानासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य बनले आहे.
दिल्ली विरूध्द बेंगळुरू या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूस प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
#DelhiCapitals win the toss and elect to bowl first against #RCB #Dream11IPL pic.twitter.com/5qW3fCq8Xg
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020
दरम्यान, हा सामना दिल्लीने गमावला तर त्यांना चौथ्या स्थानावर घसरण्याच्या धोका आहे व अशा स्थितीत त्यांना एलिमिनेटर नव्हे तर क्लालिफायरमध्ये खेळावे लागेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी कडवी लढत देण्याची शक्यता आहे.