मुंबई – राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. 9 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.