tejaswini pandit – नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj thackeray) पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यासंदर्भातील (Toll) आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी यावेळी दिल्याचं दिसून आलं.
त्यानंतर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (tejaswini pandit) सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणते, ‘म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा..’ असं ती म्हणाली होती.
दरम्यान, तेजस्विनी पंडितने असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं आहे. तिच्या ट्विटर अकाउंटवरची व्हेरिफाईड असलेली ‘ब्लू’ टिक हटली गेली आहे. आता याच मुद्द्यावरुन तिने आणखी एक ट्विट शेअर करत कडक शब्दांत ताशेरे ओढले असल्याचं यातून पाहायला मिळालं आहे.
अभिनेत्रीने म्हणते की…
कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही.!! माझ्या ट्विटर अकाउंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं.
कारण का तर मी एक आम्हा जनतेची इतकी वर्ष फसवणूक झाली, असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? ट्विटर अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं,
हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसाच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे. हे मात्र स्पष्ट होत जाईल.
#महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics pic.twitter.com/Y5UHyIVO6S
— TEJASWWINI (@tejaswwini) October 10, 2023
असो, माझा जय हिंद जय महाराष्ट्रसाठीचा जय घोष योग्य वेळी सुरुच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत.! जेव्हा-जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा-तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे’. असं तेजस्विनी पंडित म्हणाली आहे.