मुंबई :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर क्रिकेटच्या एका कोणत्या तरी प्रकारात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत.
2011, 2015 या साली मला भारतीय संघात संधी मिळाली नाही. 2019 सालीही आम्ही विजेतेपदाच्या खूपच जवळ होते. त्यावेळीही मला संधी मिळाली नव्हती. यंदा मात्र, माझ्या नेतृत्वात भारतीय संघाला विश्वकरंडक जिंकण्याची चांगली संधी आहे. एकदिवसीय कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी विश्वकरंडक हातात घेण्याचे तसेच तो उंचावण्याचे माझे स्वप्न आहे, असे रोहितने सांगितले.
यंदाच्या स्पर्धेत माझ्यासह सर्वच खेळाडू तणावमुक्त राहणे महत्त्वाचे आहे. माझी 2019 सालच्या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा होती. मात्र, त्यावेळी ती संधी हुकली. माझी तेव्हा मानसिकरित्या चांगली स्थिती होती. मी तेव्हा चांगली तयारीही केली होती. मात्र, त्यावेळी जे शक्य झाले नाही ते यंदा करायचे आहे, असेही रोहित म्हणाला.
रोहितने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 52 कसोटी, 244 एकदिवसीय तसेच 148 टी-20 सामने खेळले आहेत. रोहितने एकदिवसीय सामन्यांत 9 हजार 837, कसोटीत 3 हजार 677 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार 853 धावा केले आहेत.