मुंबई – राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी मदतीचा 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून, निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली. गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शासनानं विशेष बाब म्हणून, पंधराशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 178 कोटी 25 लाख रुपये इतका निधी जमा केला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.