ब्रिस्बेन – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने तीन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून इतिहास घडवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली.
दरम्यान, गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने कायम वर्चस्व राखलेले आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर गेली 32 वर्षे ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य होता. येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या 55 कसोटी सामन्यापैकी ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय संपादित केले आहेत. तर 13 सामने अनिर्णित राखत फक्त 9 पराभव पत्कारले आहे.
पण आज, येथील मैदानावर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत चारीमुंड्या चितपट केले आहे. कोणत्याही पाहुण्या संघाला त्या मैदानावर कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारता आली नव्हती. पण आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अबाधित राहिलेला विक्रम भारतीय संघाने अखेर मोडीत निघाला.
विशेष म्हणजे गाबाच्या ( #Gabba ) मैदानावर आतापर्यंत 250 पेक्षा जास्त धावांचे आव्हान कोणत्याही संघाला पार करता आले नव्हते. 1951मध्ये वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाविरोधात या मैदातान 236 धावांचे आव्हान पूर्ण केले होते. ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर कोणताही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा काढू शकला नव्हता. पण भारतीय संघाने 70 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढत नवीन इतिहास रचला आहे. ( Team India break 70 years old record, biggest run chase in Gabba Brisbane )