जळोची, (वार्ताहर)- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती शहरातील टकारी समाज बांधवांचे 1991 पासून चे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. टकारी समाजाच्या विविध अडीअडचणी सोडवणे कामे अजित पवार यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे. बारामती नगरपरिषदेमध्ये गेली 22 वर्ष टकारी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.
पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करायची संधी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती शहरातील व तालुक्यातील टकारी समाज बांधव महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही टकारी समाज जनसंवाद मेळाव्यामध्ये देण्यात आली.
बारामती येथे दूध संघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहर व तालुक्यातील टकारी समाज बांधवांचा जनसंवाद मेळावा पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी टकारी समाजाचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
यावेळी शहराध्यक्ष जय पाटील, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, युवकचे अध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल गायकवाड, ओंकार जाधव, सयाजी गायकवाड, महेश गायकवाड, सुभाष जाधव, बाळासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, संतोष जाधव, संजय जाधव, संजय गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. ओंकार जाधव यांनी प्रास्ताविक केले. अनिल गायकवाड, सयाजी गायकवाड, अविनाश गायकवाड यांनी टकारी समाजाची भूमिका मांडली. मेळाव्यास टकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.