पर्थ : शफाली वर्मा आणि जेमिमा राॅड्रिग्स यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी १४३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
#TeamIndia post 142/6 in 20 overs, the highest score of this #T20WorldCup so far. 💪
Over to the bowlers now. #INDvBAN
Live 👉https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/2ZftTKk9Td
— BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020
बांगलादेशने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या ३९(१७), जेमिमा राॅड्रिग्सच्या ३४(३७), वेदा कृष्णमूर्तिच्या नाबाद २०(११), रिचा घोषच्या १४(१४) आणि दीप्ति शर्माच्या ११(१६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४२ अशी मजल मारली.
बांगलादेशकडून गोलंदाजीत पन्ना घोषने ४ षटकात २५ धावा देत २ तर सल्मा खटुनने ४ षटकात २५ धावा देत २ विकेट घेतल्या. भारताच्या दोन फलंदाज जेमिमा आणि दीप्ति धावबाद झाल्या.