T20 World Cup 2024, Virat Kohli – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-२० विश्वकरंडक संघातून वगळला जाऊ शकतो, असा दावा काही माध्यमांनी केला होता. पण कोणत्याही परिस्थितीत कोहली संघात हवाच असे मत रोहित शर्माने निवड समितीकडे व्यक्त केले आह, असा दावा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.
भारताच्या १९८३ विश्वकरंडक संघातील माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी ट्विटरवर कोहलीचा फोटोसह ही पोस्ट शेअर केली आहे. कोहलीला टी-२० संघात संधी मिळत नसल्याबद्दल इतर निवडकर्त्यांशी बोलण्याची आणि त्यांनी समजावण्याची जबाबदारी अजित आगरकर यांना दिली होती. त्यासाठी १५ मार्चपर्यंतची वेळही देण्यात आली होती.
अजित आगरकर यासाठी ना निवडकर्त्यांना विराटबद्दल समजवू शकले ना स्वत:ला पटवून देऊ शकले. जय शाह यांनी रोहितला विराटबद्दल विचारले. तेव्हा रोहित म्हणाला, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे. कोहली टी-२० विश्वकरंडक खेळणार हे त्यामुळे जवळपास निश्चित मानले जात आहे.
गेल्या टी-२० विश्वचषकातही कोहली संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. २०२२ सालच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात कोहलीचेच योगदान कोणीच विसरू शकणार नाही. असे असूनही, कोहलीला आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत संघाचा भाग नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण रोहितच्या मागणीमुळे या वृत्तात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.