IND vs PAK, T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत आहे. त्याचवेळी भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी सामना होणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. वास्तविक, आयसीसीने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत एक राखीव दिवस असेल. म्हणजेच या दिवशी पावसाने व्यत्यय आणला तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल.
ग्रुप स्टेज, सुपर-8 आणि बाद फेरीसाठी वेगवेगळे नियम…
आयसीसीच्या वार्षिक बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. याशिवाय ग्रुप स्टेज आणि सुपर-8 सामन्यांच्या निकालासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 5 षटके खेळावी लागतील. पण बाद फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 10 षटके खेळावी लागतील, त्या आधारे विजेत्याची निवड केली जाईल.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
T20 विश्वचषकात भारत ‘या’ संघांविरुद्ध खेळणार …
या T20 विश्वचषकाची सुरुवात अमेरिका विरुद्ध कॅनडा सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ ग्रांप्री स्टेडियममध्ये आमनेसामने येतील. भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर, या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जून रोजी होणार आहेत. यानंतर 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना होणार आहे. वेस्ट इंडिज शिवाय अमेरिका या स्पर्धेचे आयोजन करत आहे. भारतीय संघाने 2007 चा T20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर टीम इंडियाला कधीही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.