मुंबई – वेस्ट इंडिज व अमेरिका येथे येत्या जुन महिन्यात होत असलेली टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा मला विश्वास आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. मात्र, आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखत नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही आम्ही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आम्ही विजेतेपदापासून दूर राहिलो. त्यावेळी झालेल्या चुका निश्चितपणे सुधारून टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळू, असेही त्याने सांगितले.
सध्या आमचे पहिले प्राधान्य मायदेशात होत असलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आहे. त्यामुळे सध्यातरी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करत नाही. आयसीसीची कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आत्ता आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे. विश्वकरंडकाला कमी लेखत नसून केवळ आम्ही सगळे मिळून जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा प्राधान्यक्रमही ठरवत असतो, असेही रोहितने सांगितले.
📢 Announced!
Take a look at #TeamIndia‘s group stage fixtures for the upcoming ICC Men’s T20 World Cup 2024 👌👌
India will play all their group matches in the USA 🇺🇸#T20WorldCup pic.twitter.com/zv1xrqr0VZ
— BCCI (@BCCI) January 5, 2024
मी एकदिवसीय विश्वकरंडक पाहत मोठा झालो आहे. ज्यावेळी ही स्पर्धा भारतात होते त्यावेळी एक वेगळीच उर्जा असते. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केले मात्र विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. संपूर्ण संघ निराश झाला होता. मला खात्री आहे की चाहतेही संतापले होते. मात्र आमच्याकडे टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची व चाहत्यांचे प्रेम पुन्हा मिळवण्याची संधी आहे आणि ही संधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. मात्र, त्यापूर्वी आम्हाला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी सध्या आम्ही सगळेच गांभीर्याने विचार करत आहोत. येत्या सोमवारपासून संघाचे सराव सत्रही सुरु होत आहे. त्यात सराव करताना इंग्लंडच्या गोलंदाजीचा अभ्यास करुन त्यानूसार कसे खेळायचेहे देखील निश्चित करणार आहोत, असेही रोहित म्हणाला.
Team India : अजिंक्य रहाणेचा कसोटी संघात पुनरागमनाचा शेवटचा मार्गही झाला बंद? जाणून घ्या, कारण…
संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफही सराव सत्रात सगळ्याच खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात व त्याचा लाभही होतो. संघात जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत मात्र, जे नवोदित आहेत त्यांना ही कसोटी मालिका कारकीर्द घडवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार ध्रुव जुरेल, केएस भरत आणि आवेश खान यांच्यापैकी ज्यांना अंतिम संघात संधी मिळेल त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहीजे. भारतीय संघात प्रचंड स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येक सामना गांभीर्याने खेळला गेला पाहीजे, असे मतही रोहितने व्यक्त केले.
World Test Championship (2023-2025) : टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी मालिका महत्वाची…
IND vs ENG पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, कुलदीप यादव, महंमद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.