मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अनेकदा स्वरा अनेक विषयांवर आपलं मत बेधकपणे मांडतांना दिसते. स्वराला सर्व राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडायला आवडते. मात्र स्वराचा हा धाडसी आणि स्पष्टवक्ता स्वभाव तिच्या करिअरच्या वाटेवर आला आहे. इंडिया टुडे मॅगझिनशी संवाद साधताना स्वराने सांगितले की, ‘तिच्या मतामुळे तिला कसे चित्रपट मिळणे बंद झाले.’
स्वरा सध्या तिच्या आगामी ‘जहां चार यार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. महिलांवर आधारित हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तीन वर्षांनंतर स्वरा चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
स्वराची बुडत चाललेली कारकीर्द वाचवण्यासाठी हा चित्रपट रामबाण उपाय असल्याचे मानले जात आहे. स्वराच्या राजकीय विधानांमुळे तिला अनेकवेळा चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत स्वराने सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.
स्वरा म्हणाली की, मन की बात जाहीरपणे म्हणण्याचा फटका तिला सहन करावा लागला. माझे अनेक आघाड्यांवर नुकसान झाले आहे. यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला चित्रपट मिळणे बंद झाले होते.’
स्वरा म्हणाली,”लोकांनी मला सांगितले की,फिल्मचे लोक मला कास्ट करायला खूप घाबरतात. फिल्म इंडस्ट्री आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर भीतीचे वातावरण आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे मला स्वतंत्र विचारांचे निर्माते आणि दिग्दर्शकांकडून समान काम आणि पाठिंबा मिळत आहे.’