मुंबई – नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज नागपूरच्या मेडिकलमध्ये अशीच घटना घडली आहे. रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे ( Supriya Sule )यांनी यावरून शिंदे – फडणवीस – पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
‘भय इथले संपत नाही’ आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूरात देखील २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय.