मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही न्यायालयाच्या निर्याणाचे स्वागत करत सरकारवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले कि, ‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत हा निर्णय स्वागतार्ह आहे. तमाम आंदोलकांचा हा विजय आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला ही चपराक आहे. अंतिम निर्णय ही ‘आरे’च्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त ट्विटरद्वारे केला.
‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत हा निर्णय स्वागतार्ह आहे. तमाम आंदोलकांचा हा विजय आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला ही चपराक आहे. अंतिम निर्णय ही ‘आरे’च्याच बाजूने लागणार याचा मला विश्वास आहे. #AareyChipko #AareyProtest #AareyKillerDevendra #Aarey pic.twitter.com/FKckCnAXGE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 7, 2019
दरम्यान, रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप ‘त्यांनी’ केले त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशी टीका शिवसेनेने केली होती. या टीकेचा समाचार घेताना धनंजय मुंडे म्हणाले कि, जेव्हा ‘आरे’ उद्धवस्त होत होतं तेव्हा उद्धवजी ठाकरे मांडीला मांडी लावून जागावाटपाच्या वाटाघाटी करत होते. तेव्हा ‘आरे’बाबत ब्र देखील काढला नाही. तुमचा फुकटचा कळवळा नकोय मुंबईकरांना, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.