नवी दिल्ली – राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. तर राफेल प्रकरणी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माफी स्वीकार करत न्यायालयाने फटकारले आहे. तसेच भविष्यात अशा कोणतेही वक्तव्य करताना काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला आहे.
Supreme Court closes a contempt plea filed by BJP MP Meenakshi Lekhi against Congress leader Rahul Gandhi for wrongly attributing to the court his “chowkidar chor hai” slogan against Prime Minister Narendra Modi in the #Rafale case. pic.twitter.com/lcundUF5Vb
— ANI (@ANI) November 14, 2019
याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले कि, राहुल गांधी यांचे विधान खेदजनक आहे. राहुल गांधींनी वक्तव्य करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले.
The Supreme Court says “Mr Rahul Gandhi needs to be more careful in future” for attributing to the court his remarks. https://t.co/MjG0POUVfj
— ANI (@ANI) November 14, 2019
लोकसभा निवडणुकीवेळी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता ‘कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है’, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती. या वक्तव्यामुळे राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली होती.