जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची ग्वाही
पुणे – वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवा असून, त्याच्यापासून करोनाचा कोणताच धोका नाही. त्याचे वितरण सुरू करण्यासाठी पाठिंबा असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली. याशिवाय, वृत्तपत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांना न अडवण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वृत्तपत्रांची छपाई ही अत्याधुनिक मशीनवर स्वयंचलित पद्धतीने केली जाते. छापलेल्या अंकावर सॅनिटायझेशन केले जाते. अंकाच्या पार्सलवरही ती प्रक्रिया केली जाते. याशिवाय “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ नेही या विषयाला “ग्रीन सिग्नल’ दिला आहे. याशिवाय पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनीही यासंदर्भात निर्वाळा दिला.
आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्य, शहर आणि गाव पातळीवरील वस्तुनिष्ठ बातम्या तळागाळापर्यंत पोहोचाव्यात या हेतूने आणि सरकारच्य पाठिंब्याच्या आधारेच पुन्हा एकदा वृत्तपत्रांची छपाईला सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून करोना सारख्या संकटकाळातही आपण एकमेकांच्या साथीने राहून या संकटावर मात करू शकतो हा देखील यामागचा उद्देश आहे.