दुबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका जरी होत नसल्या तरीही या संघांत आयसीसीच्या अधिकृत स्पर्धांमध्ये लढती होत आहेत. तशाच लढती आता आयसीसीच्या दरवर्षी होत असलेल्या स्पर्धांमध्ये होणार असून, त्यामुळे हे परंपरागत प्रतिस्पर्धी प्रत्येक वर्षी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
यंदा होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपासून 2031 सालच्या स्पर्धेपर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यावर्षी भारतातील विश्वकरंडक स्पर्धेनंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात हीच स्पर्धा होणार आहे.
या बैठकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेदेखील ऑनलाइन सहभागी झाले होते.