कोलकता – चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील करोना लसीकरण पूर्ण करण्याचा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, केंद्राचा तो दावा म्हणजे अफवा असल्याची खिल्ली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी उडवली.
मागील वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारकडून लसीकरणाचे आश्वासन देण्यात आले. मात्र, काहीच घडले नाही. ते सरकार राज्यांना लसींचा सुरळीत पुरवठा करत नाही. जो काही थोडाफार साठा मिळतो; तो काही दिवसांतच संपतो, अशा शब्दांत ममतांनी येथे पत्रकारांशी बोलताना लसटंचाईकडे लक्ष वेधले.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लसी उपलब्ध कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.