आताच्या घडीला महिलांनी सर्व क्षेत्रात उंच भरारी घेतली असून क्रीडा या क्षेत्रात विशिष्ट कामगिरी केली आहे. खेळ खेळल्याने शारीरिक स्वास्थ्य चांगले रहाते असे आपण ऐकत आलो आहे;विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव शालेय जीवनापासून (बालपण)मिळत आहे.
विद्यालय/ महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून कबड्डी, खो-खो,रनिंग, क्रिकेट या खेळांना प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे खेळ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले जात असून विद्यार्थीनी खेळामध्ये सहभागी होत आहेत.परंतु स्विमिंग, फुटबॉल, धनुरविदया, बॉक्सिंग,शूटिंग, बॅडमिंटन, व्हाॅलीबाॅल या खेळांना प्रतिसाद मिळत नाही. या खेळामध्ये पी.टी.उषा-अॅथलेटिकस, साक्षी मलिक- बाॅकसिंग, पी.व्ही. सिंधू- बैंडमैटन यांनी उत्तुंग कामगिरी केली असली तरी मुलींचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून विविध भागात पथनाट्य सादर करून लोकांमध्ये खेळाचा विस्तार, खेळाबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तर पालकांचा योग्य पाठिंबा मुलींच्या कलागुणांना मिळेल.
तसेच महाविद्यालयात/ विद्यालयात क्रीडा शिबिरे आयोजित करून प्रत्येक खेळाबद्दल पूर्ण माहिती तसेच प्रात्यक्षिक देवून कौशल्य, कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करावा. याची सुरुवात महाविद्यालातूनच केली तरच भावी पिढी मध्ये सानिया नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांच्या सारख्या क्रीडा महिला निर्माण होवून नावलौकिक इतिहास घडवतील. यांवर कविता सांगाविशी वाटते…
अपने युग की बात बनाओ,
खेल को खेल के नाम कमावो ,
अब-तक खेल का परछम यू लेहराथा,
सानिया, सिंधू जादू चलता,
खेल नही तो नाम नही,
खेल नही तो रोम नही ,
खेल नही तो स्वास्थ्य नही ,
खेल को तुम खेलना समझो,
खेल से ही तुम भविष्य बनाओ.
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
तळेगाव दाभाडे