मुंबई: शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार रामदास कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. दरम्यान, आज राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यपाल भगत सिंह यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांची सवांद साधला, यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले. ज्यांच्याकडे बहुमत असेल ते सरकार स्थापन करतील. शिवसेना सरकार स्थापनेबाबत अडथळा ठरत नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यपाल यांची फक्त सदिच्छा भेट घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.