मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या काही वरीष्ठ नेत्यांना राज्यात फेरनिवडणूक घ्यावी. ती आपण बहुमताने जिंकू; असा विश्वास आहे, असे भाजपा नेते जयकुमार रावल म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असतानाच भाजपा नेते जयकुमार रावल यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर रावल यांच्या विधानाला महत्त्व आले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाला आमच्यावर युती लादू नका असे सांगितले होते. आम्ही स्वबळावर लढू आणि विजयश्री खेचून आणू, असा विश्वास दिला होता, असेही रावल यांनी स्पष्ट केले. शिवसेनेशी युती करताना सत्तेचे आणि जबाबदारीचे समान वाटप करण्याचे भअजपाने मान्य केले होते. त्यामुळे पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, अशी मागणी करत शिवसेनेने लावून धरली आहे. दिवाळीच्या दिवशी निवडक पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री मीच असणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर दोन्ही पक्षातील संवाद थांबला होता.
दरम्यान, हे रावल यांचे हे विधान हे सरकारला पाठींबा मिळवण्यासाठी आमदारांवर दडपण आणण्याच्या हेतूने केले असण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेचा दावा दाखल करतील त्यानंतर बहुमत सिध्द करण्याच्या काळापर्यंत कर्नाटक पॅटर्न राबवतील, असाही अंदाज काही निरीक्षक व्यक्त करत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे,अशी राज्यपालांना विनंती करणार असल्याचे सांगितले आहे.