मुंबई – खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा उल्लेख करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा शिवसेनेला विसर पडला आहे, असे राणा म्हणाल्या आहेत. परिणामी राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
दरम्यान, मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच आणि मला कोणी रोखू शकत नाही, असे आव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले,’हे हे फिल्मी लोक असून बंटी आणि बबली पोहोचले असतील तर पोहोचू द्या. ही केवळ स्टंटबाजी, मार्केटिंग करणं आहे आणि हे त्यांचं काम आहे. भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. , नवनीत राणा या केवळ स्टंटबाजी करत. ते पुढे म्हणाले,’हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत.” असं म्हणत राऊत यांनी राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे.
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांत शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, माझ्याकडे दुहेरी ताकत आहे, असे राणा म्हणाल्या आहेत. अमरावतीतील राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर वाद वाढला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा हे 23 तारखेला मुंबईत हनुमान चालिसा म्हणण्यासाठी येणार आहेत. परिणामी मुंबई पोलिसांनी राणांना नोटीसदेखील बजावली आहे.