मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोर मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरुन राज्यात एकच गोंधळ उडाला आहे.अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. दरम्यान अमोल मिटकरी यांनी या वादावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केवळ तीन शब्दांचा वापर केला आहे.
सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता.त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु झाला आहे. अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीवर टीका होताना पाहायला मिळत आहे.
“वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….”
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 22, 2022
दरम्यान, ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचेहीम्हटले आहे हे सर्व होत असताना अमोल मिटकरी यांनी “वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….” असे ट्वीट करत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी यामधून मौन बाळगणे योग्य असल्याचे म्हटले आहे.