मुंबई – येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. आपल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून आमदारांना येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चूूरस आहे. त्यातही या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत होणार असल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दोन्ही बाजूंनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे.
शिवसेनेला आपले आमदार फुटण्याची भीती वाटते काय, असे विचारता शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याचा इन्कार केला. ते म्हणाले की, अशा निवडणुकीपूर्वी सर्व आमदारांना एकत्र बोलावणे ही एक सामान्य प्रथा आहे त्यात विषेश असे काही नाही.