शिरूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून या पुरामुळे शिरूर नगर परिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बाजूकडील मातीचा भरावा तोडून पाणी 30 ते 35 मीटर लांबून वाहत असल्याने व पाण्याचा प्रवाह जलद गतीने असल्याने काही प्रमाणात या कोल्हापुरी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.
डिंबे व कुकडी धरणामधून जवळपास 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे घोडनदीला पूर आला असून यामुळे नगरपरिषदेच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिरूर शहरालगत असणाऱ्या घोडनदी डिंबा व कूकडी प्रकल्पाच्या धरणातून सध्या 35,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेचे पूर पथक सतर्क असून नदी काठावरील रहिवाशांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नगरपरिषदेस संपर्क करणेचे आवाहन सभागृहनेते प्रकाशभाऊ धारीवाल व मुख्य अधिकारी रोकडे यांच्यावतीने करणेत येत आहे.
पथकातील अधिकारी व कर्मचारी मोबाईल क्रमांक –
नेमाडे: ९८९०१५०८९२ , बर्गे : ९९६००६६९१३ , दळवी: ९४२२११४२७०