Sharad Pawar on Supriya। राज्यात जेंव्हा पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत तेंव्हापासून दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदावर भाष्य केलंय. संधी असतानाही सुप्रियाला मंत्री बनवण्याचा विचार मी केला नाही असे म्हणत आजकालच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोट ठेवलं.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर भाष्य Sharad Pawar on Supriya।
बारामती येथील नागरिकांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवार यांनी यावेळी, “मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणलं होतं. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत. ते वेळ देतात, कष्ट करतात.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सुप्रियाला मंत्री करु शकलो असतो…Sharad Pawar on Supriya।
इंदिरा गांधींनी देशाची प्रतिष्ठा वाढवली. महत्त्वाचा अधिकार असलेल्या व्यक्ती मी पाहिल्या आहेत. तसंच राजकारणात मी माझ्या अधिकाराचा उपयोग मुलीसाठी केला नाही. मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही, अन्य लोकांचा विचार मी केला नाही. संसदेची स्थिती चिंता करण्यासारखी आहे. भाजपा संविधान बदलायला निघाली आहे असंही शरद पवार म्हणाले.
“उमेदवाराचा विचार करताना क्वालिटीचा विचार तुम्ही करावा. लोकांच्या आयुष्यात बदल करू शकलो तर, आपल्या पदाचा उपयोग होतो. आधी शिक्षण म्हटलं की, मुंबई किंवा पुणे याशिवाय पर्याय नव्हता, आता शैक्षणिक हब बारामती म्हणून बघितले जातात. कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्था काढल्या. कृषी विकास प्रतिष्ठान हे देशातील पहिल्या तीनमध्ये त्याचा नंबर लागतो. डोनेशन नावाचा प्रकार इथे नाही, इथे ही संस्कृती नाही. कर्तृत्ववान फक्त मुले असतात, हे डोक्यातून काढा. मुलींना संधी मिळाली तर, त्या कर्तृत्व सिद्ध करतील.” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावला आहे.