मुंबई – राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यासोबतच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास शरद पवार मुख्यमंत्री बनतील तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल, असेही चर्चिले जात होते. मात्र मला मुख्यमंत्री बनण्यात कोणताही रस नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे समीकरण तयार झाल्यास तुम्ही मुख्यमंत्री होऊ इच्छिता का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यात काहीही रस नाही, असे म्हणत पवारांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.