नवी दिल्ली :- मणिपूर हिंसाचाराच्या निमित्ताने भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आंतरराष्ट्रीय कटात सहभागी असलेल्या सेमिनलून गंगटे याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे.
एनआयएने 19 जुलै रोजी गंगटेविरोधात गुन्हा दाखल केला होता. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मणिपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी सेमिनलून गंगटेला 3 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवले आहे.
एनआयएच्या तपासात असे आढळून आले की, म्यानमार आणि बांगलादेशच्या अतिरेकी गटांनी विविध वांशिक गटांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतातील अतिरेकी नेत्यांच्या एका विभागासह कट रचला. त्यामध्ये गंगटे यांचा समावेश होता. त्यांचा उद्देश भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा होता. त्यासाठी दहशतवाद पसरवण्यासाठी शस्त्र, दारूगोळा आणि पैसा पुरवला जात आहे. सीमेपलीकडे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांकडून शस्त्रास्त्रांसारखी इतर सामग्री खरेदी केली जात आहे.
23 सप्टेंबर रोजी एनआयएने पीपल्स लिबरेशन आर्मीचा सक्रिय सदस्य मोइरंगथेम आनंद सिंग या आणखी एका आरोपीलाही अटक केली होती. 19 जुलै रोजी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला असून आरोपीला दिल्लीत आणण्यात आले आहे.मणिपूर पोलिसांनी गंगटेला चुराचंदपूर येथे अटक करून एनआयएकडे सोपवले.
म्यानमार आणि बांगलादेशातील दहशतवादी गटांनी विविध जातीय गटांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या आणि भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या उद्देशाने भारतातील दहशतवादी नेत्यांच्या एका गटाशी गंगटेने हातमिळवणी केली आहे. हे एक षड्यंत्र असून सातत्याने हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकरणी एनआयएने 22 सप्टेंबर रोजी मणिपूरमधून मोइरंगथेम आनंद सिंगला अटक केली होती.