Manipur Violence : गेले काही महिने दंगलीने ग्रस्तताशा अशांत मणिपूरमध्ये ( Manipur ) कार्यरत असलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (युएनएलएफ) या दहशतवादी गटाने बुधवारी सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि हिंसाचार सोडण्याचे मान्य केले.
युएनएलएफ हा मणिपूरच्या इंफाळमध्ये कार्यरत असलेला सर्वात जुना सशस्त्र गट आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे म्हटले आहे. अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे की, नवी दिल्लीत शांतता करारावर ऐतिहासिक स्वाक्षरी केली.”
अमित शाह म्हणाले, मणिपूरमध्ये कार्यरत असलेला सर्वात जुना सशस्त्र गट यूएनएलएफने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.
भारत सरकार आणि मणिपूर सरकारने युएनएलएफ सोबत केलेल्या शांतता करारामुळे सहा दशकांच्या दीर्घ सशस्त्र संघर्षाचा अंत झाला आहे.
शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसमावेशक विकासाचे आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोनाची ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
असे आहेत याआधीचे करार –
२०१४ – अचिक नॅशनल व्हाॅलेंटिअर कौन्सिल करार
२०१९ – नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ त्रिपुरा
२०२० – ब्रु जमातीसंदर्भात करार
२०२० – बोडोलॅंड करार
२०२१ – आफस्पाच्या व्याप्तीत घट करार