पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे तसेच संशयाच्या भोवऱ्यात आहे. यूपी एटीएसने तिची चौकशी केली. यानंतर सीमा मीडियासमोर उघडपणे बोलली. एटीएसने आपली चौकशी कशी केली हे तिने सांगितले. यासोबतच सीमाने 6 पासपोर्ट, तुटलेला मोबाईल, वडील आणि भाऊ यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
सीमाने सांगितले की, एटीएसने प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीची विचारणा केली. “माझी पहिल्यांदा पाकिस्तान विमानतळावर चौकशी करण्यात आली. माझ्याकडे तिकीट, व्हिसा, सर्व काही कायदेशीर होते. आता खोटे बोलले जात आहे की मला 8 मे रोजी व्हिसा आणि पासपोर्ट मिळाला होता. माझा पासपोर्ट पूर्वी बनवला गेला होता”.
‘यामुळे मी माझा पासपोर्ट पुन्हा बनवला’
6 पासपोर्ट असल्याच्या प्रश्नावर सीमा म्हणाली, “यामध्ये चार पासपोर्ट मुलांचे आहेत आणि दोन माझे आहेत. यापैकी माझ्या एका पासपोर्टवर आडनाव नव्हते. त्यामुळे मला नेपाळमध्ये व्हिसा मिळाला नाही. यामुळे मी पुन्हा पासपोर्ट बनवला होता.”
सीमा पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांना माझा बॉयफ्रेंड म्हटले जात आहे. भावाला माझा नवरा म्हटले जात आहे. माझ्याबद्दल खूप चुकीचे बोलले जात आहे. माझी विनंती आहे की माझ्या वडिलांना वडील राहुद्या. , बॉयफ्रेंड बनवू नका. भावाला भाऊ राहू द्या.”
‘याशिवाय भारतात येण्याचे प्रयोजन नाही’ –
“माझ्याकडे तीन आधार कार्ड आहेत हे खोटं आहे. माझ्याकडे फक्त एकच आधार कार्ड आहे. याशिवाय एक वडिलांचं आहे, एक पहिल्या पतीचं आहे. मी आधीही सांगितलं होतं. भारतात येण्याचा उद्देश फक्त सचिनवरील प्रेम आहे. याशिवाय काहीही नाही आणि काहीही असू शकत नाही.”
सीमाने सांगितले की, मला पाकिस्तानात जायचे नाही. भारतात मृत्यू आणि तुरुंगवासही स्वीकारेल. माझे भविष्य फक्त भारतात आहे. फक्त इथले नागरिकत्व मिळावे. एटीएसच्या चौकशीत सीमा हैदरने सांगितले की तिने 2019 नंतरच PUBG खेळायला सुरुवात केली होती, त्यानंतर हिंदी भाषा बोलायला शिकली कारण ती भारतातील सुशिक्षित मुलांसोबत PUBG खेळायची.
‘अर्थ, अनर्थ, शरण असे शब्द बोलायला कसे शिकली’ –
सूत्रांचे म्हणणे आहे की, एटीएसने सीमा हैदरला विचारले असता, ती अर्थ, अनर्थ, शरण असे शब्द कसे बोलायला शिकली, उत्तर भारतीयांप्रमाणे उच्चार कसा करायचा? तर उत्तरात सीमाने तीच गोष्ट पुन्हा सांगितली की ती इथली भाषा सचिनकडूनच शिकली.
प्रशिक्षण कोणी दिले?
यानंतर सचिन मीणाला स्वतः हिंदी नीट बोलता येत नाही, ते पश्चिम उत्तर प्रदेशातील बोली बोलतात, मग तुम्हाला याचे प्रशिक्षण कोणी दिले? यावर सीमाने मौन बाळगले. मात्र, तिला कोणीही प्रशिक्षण दिलेले नाही, असे ती आपल्या बचावात बोलत राहिली. ती फक्त आणि फक्त तिच्या प्रेमासाठी म्हणजेच सचिनसाठी सीमेपलीकडून आली आहे, असे ती म्हणते.
तीला अजून कोणी मदत करत आहे का?
एटीएसच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर सीमाने आतापर्यंतच्या चौकशीत एटीएसच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जसे ती आत्तापर्यंत मीडियाशी उघडपणे बोलत होती. अशा परिस्थितीत एटीएस हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, सीमाला पूर्ण प्रशिक्षण देऊन कोणीतरी भारतात पाठवले आहे आणि अजूनही कोणीतरी तिला मदत करत आहे का? एटीएसकडून अजून अधिक तपास केला जाणार आहे.