मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर रोज नवीन अडचणी निर्णय होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झालेले असताना दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे.
जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं!.
जय महाराष्ट्र !. pic.twitter.com/BeQNDziC3w— Sanjay Raut (@rautsanjay61) July 8, 2022
संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटमध्ये शिवसेना अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून लढा देण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच मिळत आहेत. “जब ‘खोने’ के लिए कुछ भी ना बचा हो तो ‘पाने’ के लिए बहुत कुछ होता है! जय महाराष्ट्र!” असे ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.
शिवसेनेतून आधी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार, त्यानंतर ठाणे-नवी मुंबई-कल्याणमधले नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्यानंतर आता काही शिवसेना खासदारांनी भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी आता वाढताना दिसून येत आहेत.