मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहूमत मिळाले असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वादावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने सत्ता स्थापण करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते बैठकीत उपस्थित होते.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाआघाडी आणि युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अजित पवार म्हणाले, की ‘मला काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी मेसेज केला. मी बैठकीत असल्यामुळे त्यांना रिप्लाय करु शकलो नाही. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संजय राऊत यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे’. असं पवार म्हणाले.
Ajit Pawar, Nationalist Congress Party: I received a message from Sanjay Raut a while ago, I was in a meeting so couldn’t respond. This is the first time after elections that he has contacted me, I don’t know why he has messaged me. I will call him in a while. #Maharashtra pic.twitter.com/HAjKqBlsY3
— ANI (@ANI) November 3, 2019