Sanjay Raut on Fadnvis । बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे आज आणि उद्या होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण मिळालेलं नाही. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.
महारोजगार मेळावा त्यांच्या माता-पित्यांचा आहे का? Sanjay Raut on Fadnvis ।
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी,”अशा प्रकाराचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. सरकारी कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून त्या व्यक्तिला बोलवायचं नाही असं कधीही होत नव्हतं. महारोजगार मेळावा हा काही यांच्या माता-पित्यांचा आहे का? अशा शब्दात त्यांनी टीका केली.
तसेच महारोजगार मेळावा सरकारी योजना आहे, ती भाजपाची किंवा शिंदे गँगची योजना नाही. विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात. तरीही सरकार शरद पवारांना बोलवत नाही? अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं आहे. त्याआधी असं डर्टी पॉलिटिक्स अलिकडे सुरु झालंय. असे त्यांनी म्हटले.
“देवेंद्र फडणवीस राजकारणाला लागलेली वाळवी” Sanjay Raut on Fadnvis ।
हा कोणता खेळ चालला आहे राज्यात? पैसे तुमच्या घरच्या झाडाला आलेत का? वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर जी झाडं आहे त्यांना खोके लागलेत का? तिथे जमिनीतून खोके उगवत आहेत का? मर्जीप्रमाणे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रण देत नाही हा कुठला प्रकार आहे? केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाला लागली आहे. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.