मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने ईडीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राऊत यांना झालेली अटक अवैध आहे. ती कारवाई म्हणजे छळवणुकीचा प्रकार आहे, असे न्यायालयाने म्हटले.
ED selective अटक करत आहे ह्यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता, ED ने मर्जीच्या आरोपींना अटक केली ह्यातही शंका नाही. ED चा सर्रास गैरवापर होतोय. पण राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 10, 2022
ईडीने संबंधित प्रकरणातील इतर आरोपी असणाऱ्या प्रविण राऊत यांना केवळ दिवाणी स्वरूपाच्या वादावरून अटक केली. तर, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक करण्यात आली. म्हाडा किंवा 672 कुटूंबांची फसवणूक करण्याचा संजय आणि प्रविण राऊत यांचा हेतू असल्याचे कशावरूनच आढळून येत नाही.
अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या,’ED selective अटक करत आहे ह्यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता, ED ने मर्जीच्या आरोपींना अटक केली ह्यातही शंका नाही. ED चा सर्रास गैरवापर होतोय. पण राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही.’ असेही त्या म्हणाल्या आहे.