Sanjay Raut – समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) आज झालेल्या अपघातात 12 लोक ठार आणि सुमारे 17 जखमी झाले. या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना राऊत म्हणाले, “सरकार या अपघातांचे उत्तरदायित्व घेत नाही. समृद्धी महामार्ग हा जनतेसाठी बांधलेला नाही. तो कंत्राटदार आणि कमिशनसाठी बांधला आहे, त्यांच्याकडून सरकारला मोठे कमिशन मिळते आहे.
त्या पैशाचा वापर शिवसेना फोडण्यासाठी केला गेला. भाजप, देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मिळून समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) घोटाळा केला आहे.
त्यामुळेच लोक त्या रस्त्यावर मरत आहेत असा आरोपही त्यांनी केला. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर वैजापूर टोल नाक्याजवळ पहाटे एक वाजण्याच्या सुमारास टेम्पोची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला.