मुंबई : बिहार आणि उत्तर प्रदेशात नदीच्या घाटावर मृतदेहाहंचे खच आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बिहार प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. या घटनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. हे मृतदेह करोना बाधितांचे असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
बिहारमध्ये काल गंगा नदीत100 पेक्षा जास्त प्रेतं तरंगताना आढळली. हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते, राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती. मृत्यूचं भांडवल करणं त्यांनाच जमतं.#भाजपा#गंगा_मे_बहतीं_लाशें pic.twitter.com/HGDtcwv9Z2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 11, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बिहारमधील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी, बिहारमध्ये काल गंगा नदीत १०० पेक्षा जास्त प्रेत तरंगताना आढळून आले. बिहार सारखी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पातळ एक केले असते. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती… मृत्यूचं भांडवल करणं ‘त्यांनाच” जमतं…”असे त्यांनी म्हटले आहे.
काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 12, 2021
तसेच त्यांनी आणखी एक ट्विट करत राज्यातील भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला आहे. त्यात त्यांनी काल गोव्यात झालेल्या ऑक्सिजन गळतीचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी, “काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत.” असे म्हटले आहे.