रुद्रप्रयाग – केदारनाथ यात्रेचा मुख्य भाग असलेल्या गौरीकुंडमध्ये रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. येथे दरड कोसळल्यामुळे स्थानिकांची दुकाने ढिगाऱ्या खाली गेली आहे. मध्य रात्री झालेल्या या दुर्घटनेत अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहे.
गौरीकुंडच्या सेक्टर ऑफिसरने सांगितले की, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्याचवेळी, सुमारे 13 लोक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये नेपाळी आणि स्थानिक लोकांचा समावेश आहे. पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे पोस्टल कल्व्हर्टसमोर दरड कोसळली आहे.
रात्री उशिराच एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. मात्र, पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयागमध्ये दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 ऑगस्टला हलका आणि 6 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
६ ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमधील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याने गुरुवारी बागेश्वर, नैनिताल आणि चंपावत जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यांनी येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
सतर्कतेमुळे तिन्ही जिल्ह्यांतील बारावीपर्यंतच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचवेळी डेहराडून, हरिद्वार, पौरी आणि उधम सिंह नगरसाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्ली-नोएडात रिमझिम पाऊस दिल्ली आणि नोएडातील अनेक भागात हलका रिमझिम पाऊस झाला.
दिल्लीत मध्यम आणि नोएडामध्ये ५ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान अंदाज एजन्सी, स्कायमेटने असेही म्हटले होते की, “दिल्ली आणि एनसीआर भागात पावसाच्या हालचाली तीव्र होणार आहेत. खरा मान्सून 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान दिसेल, कारण राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या लगतच्या भागात अनेक पाऊस पडतील.” मध्यम पाऊस देशाच्या काही भागांमध्ये होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस, विशेषत: 4 ऑगस्ट रोजी दिल्लीत. 6 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानंतर या प्रदेशात पाऊस हळूहळू कमी होईल.”