Rohini Khadse Tweet । राज्यातील लोकसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर होणार असल्याचे दिसत आहे. असाच सामना सध्या धाराशिव लोकसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे. याठिकाणी महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मी” कशाला राष्ट्रवादी वाढवू?” Rohini Khadse Tweet ।
अर्चना पाटील यांनी नुकतेच भाजपमधून अजित पवार गटात प्रवेश केलाय. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर लगेच त्यांना उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली. मात्र उमेदवारी जाहीर होताच फक्त तीन दिवसातच अर्चना पाटील या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात त्या मी” कशाला राष्ट्रवादी वाढवू?” अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केलीय.
टिक टिक वाजते डोक्यात,
धड धड वाढते ठोक्यात…
फक्त कमळच आहे डोक्यात,
घड्याळ आहे उसनवारीत..!#Dharashiv #LokSabhaElections2024 pic.twitter.com/jtmIa9d2qO— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 7, 2024
अर्चना पाटील या धाराशिव मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. या दरम्यान पत्रकारांनी त्यांना बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं वर्चस्व नाही. फक्त आमदार राजेंद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. रोहिणी खडसे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. “टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात… फक्त कमळच आहे डोक्यात, घड्याळ आहे उसनवारीत..!”, असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे.
अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या आहेत? Rohini Khadse Tweet ।
“मी कशाला वाढवू? म्हणजे मला कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. माझी महायुतीची उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीच्या खासदारांचा आकडा 400 पार जाण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत हे महायुतीचे घटक आहेत. माझा नवराच भाजपचे आमदार आहेत. मला इकडून निवडून देणार आहेत. मला राजेंद्र राऊत यांचा पाठिंबा असल्याने कोणत्याही गटापेक्षा महायुती वाढणार आहे”, असं अर्चना पाटील म्हणाल्या.