सांगली – सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 26 हजार 593 कुटुंबांतील 1 लाख 34 हजार 363 लोक व 30 हजार 692 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आर्मीच्या हेलिकॉप्टरमधून पुरात अडकलेल्या नागरिकांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील 20 गावांतील 4 हजार 134 कुटुंबांतील 21 हजार 884 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 5 हजार 328 कुटुंबांतील 25 हजार 245 लोक व 6 हजार 196 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
वाळवा तालुक्यातील 36 गावांतील 12 हजार 215 कुटुंबांतील 65 हजार 383 लोक व 15 हजार 117 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 20 गावांतील 500 कुटुंबांतील 2 हजार 273 लोक व 2 हजार 590 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 19 हजार 578 लोक व 455 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, ढवळी, वाळवा तालुक्यातील शिरगाव, भरतवाडी, या गावांचा संपर्क तुटला आहे.