मुंबई – करोना विषाणूने अवघ्या देशाला हैराण करून सोडले आहे. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून या विषाणू चा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. राज्यात करोना बाधितांची संख्या ११२वर पोहचलीआहे. या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त करोनाच्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी होऊन पूर्ण सर्वत्र आरोग्याचे वातावरण येवो, अशा शुभेच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन दिल्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले कि, ‘वसुधैव कुटुम्बकम’ अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा. यासोबतच तसेच त्यांनी ट्विटबरोबर एक ऑडिओ शेअर केला असून त्यामध्ये पसायदानातील ‘दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।’ या ओळी आहेत.
‘वसुधैव कुटुम्बकम’ अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा.#गुढीपाडवा pic.twitter.com/fK4wnBAebA
— Raj Thackeray (@RajThackeray) March 25, 2020